---Advertisement---

दूध ठरलं मृत्यूचं कारण, पती-पत्नीमध्ये जोरांचं भांडण, परभणीत काय घडलं?

---Advertisement---

परभणी (युवा क्रांती वृतसेवा) : सकाळी सकाळी घरामध्ये पत्नीच्या हातून दूध सांडले. दूध सांडल्याचे पाहताच पतीला राग अनवर झाला. दूध कसे सांडले यावरून पतीने पत्नीला बेदम मारहाण केली. त्यानंतर दुपारच्या दरम्यान शेतात गेल्यावरही दूध कसे सांडले यावरून पुन्हा एकदा पत्नीला काठीने मारहाण केली. पती एवढ्यावरच थांबला नाही तर रागाच्या भरात जवळ असलेल्या दस्तीने पत्नीचा गळा आवळला. आणि या दरम्यान पत्नीचा मृत्यू झाला. सदरील घटना ही परभणीच्या बलसा गावात 8 सप्टेंबर रोजी घडली. मयत महिलेचे सुनीताबाई देविदास शिंदे (वय 50 वर्षे) असे आहे.

याविषयी विस्तृत माहिती अशी की पूर्णा तालुक्यातील बलसा येथे देविदास शिंदे हे कुटुंब राहते. 8 सप्टेंबर रोजी नित्यनेमाने सुनीताबाई शिंदे यांनी सकाळी सकाळी घरकाम केल्यानंतर स्वयंपाक घरात चहा करण्यासाठी गेल्या. दरम्यान चहासाठी दूध घेताना त्यांच्या हातून दुधाचे पातेले खाली पडून दूध सांडले. यावेळी घरामध्ये देविदास शिंदे हे देखील उपस्थित होते. दूध कसे सांडले यावरून पती-पत्नीमध्ये भांडण सुरू झाले. दरम्यान देविदास शिंदे यांनी सुनीताबाईंना मारहाण करण्यास सुरुवात केली. थोडावेळ भांडण चालल्यानंतर पुन्हा दोघे शांत झाले आणि सुनीताबाई घर कामात व्यस्त राहिल्या.

घरकाम पूर्ण झाल्यानंतर दोघेजण शेतामध्ये कामासाठी गेले. शेतात गेल्यानंतरही देविदास शिंदे मात्र आपल्या पत्नीवर सकाळी दूध सोडण्यावरून झालेल्या भांडणामुळे रागात होते. शेतात गेल्यानंतर ही दुपारी एकच्या दरम्यान पुन्हा एकदा पती-पत्नीमध्ये भांडण सुरू झाले. देविदास शिंदे यांनी जवळच असलेल्या काठीने पत्नी सुनीताबाईंना मारहाण करण्यास सुरुवात केली. शेतामध्ये दोघेच असल्याने तेथे भांडण सोडण्यासाठी देखील कोणी नव्हते. रागाच्या भरात देविदास शिंदे यांनी आपल्या पत्नीला बेदम मारहाण केली. ते तेवढ्यावरच थांबले नाहीत तर जवळ असलेल्या दृष्टने आपल्या पत्नीचा गळा देखील आवळला. आणि या भांडणादरम्यान पत्नी सुनीताबाई शिंदे यांचा जागीच मृत्यू झाला.

सदरील घटना ही 8 सप्टेंबर रोजी सायंकाळी पाचच्या दरम्यान उघडकीस आली. घटनेची माहिती कळतात ताडकळस पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गजानन मोरे, उपनिरीक्षक गजानन कोठेवाडे यांच्यासह कर्मचाऱ्यांनी भेट दिली. आणि आरोपी देविदास शिंदे याला ताब्यात घेतले. याबाबत मृताचा मुलगा सुरेश शिंदे यांच्या फिर्यादीवरून आरोपी पती व वडील देविदास शिंदे यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. शुल्लक कारणावरून पती-पत्नीमध्ये झालेल्या भांडणातून पत्नीचा मृत्यू झाल्याने जिल्हाभरात हळहळ व्यक्त केली जात आहे. जिल्ह्यामध्ये कौटुंबिक कलहतून होणाऱ्या अघटीत घटनांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. लग्नाचा 25 वर्ष संसार होऊन देखील पती-पत्नीमध्ये भांडण होऊन अशा हत्या होत असतील तर कसे? असा प्रश्नच आता सर्वांना पडला आहे.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment