संग्रामपूर (आकाश बोरसे) : दरवर्षीप्रमाणे यंदाही संग्रामपूर तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती संग्रामपूर व उपबाजार समिती वरवट बकाल यांच्या संयुक्त विद्यमाने शेतकरी दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
काल दिनांक २३ डिसेंबर २०२५ रोजी शेतकरी दिनानिमित्त वरवट बकाल बाजार समितीच्या आवारात आयोजित कार्यक्रमात शेतकऱ्यांचा शाल व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमास कृषी उत्पन्न बाजार समिती (संग्रामपूर) चे सभापती तथा भाजप तालुकाध्यक्ष मा. श्री भाऊराव पाटील, उपसभापती श्री संजीव भाऊ इंगळे, भाजप जिल्हा कोषाध्यक्ष मा. श्री लोकेश भाऊ राठी, खरेदी-विक्री संचालक श्री सुरेश भाऊ मुरूख, सचिव श्री मारोडे साहेब, तसेच गोतमारे साहेब, टिकार साहेब, माटे साहेब व बाजार समितीचे सर्व कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी मान्यवरांनी शेतकऱ्यांच्या कष्टाचे महत्त्व अधोरेखित करत “शेतकरी हा देशाचा खरा आधारस्तंभ असून, त्यांच्या सन्मानातूनच समाजाची खरी प्रगती साधता येईल” असे मत व्यक्त केले. कार्यक्रमात उपस्थित शेतकऱ्यांमध्ये समाधान व उत्साहाचे वातावरण दिसून आले.












