पंढरपूर | (आकाश बोरसे) : आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त आज (दि. २५ जुलै) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सपत्नीक श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा केली. महापूजेनंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी शिक्षण, शेतकरी आणि जंतर-मंतर येथील आंदोलनासंदर्भात राज्य सरकारची भूमिका स्पष्ट केली.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शिक्षण क्षेत्रातील नव्या उपक्रमांना यश मिळावे, अशी प्रार्थना त्यांनी श्री विठ्ठलाच्या चरणी केली. तसेच राज्यात भरपूर आणि समाधानकारक पाऊस पडून खरीप हंगामातील पिकांना योग्य बाजारभाव मिळावा, शेतकरी सुखी, समृद्ध आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावेत, अशीही प्रार्थना त्यांनी केली.
जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या आंदोलनाबाबत बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, विद्यार्थी शांततेच्या मार्गाने आंदोलन करत आहेत. मात्र काही घटक या आंदोलनात अराजक निर्माण करून राजकीय वातावरण बिघडविण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे शांततापूर्ण आंदोलन आणि अराजक निर्माण करणाऱ्या प्रवृत्ती यामध्ये फरक ओळखणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
आषाढी एकादशीच्या निमित्ताने मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्यातील जनतेच्या सुख-समृद्धीसाठी, शिक्षण क्षेत्राच्या प्रगतीसाठी आणि शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी श्री विठ्ठलाच्या चरणी प्रार्थना केली.(युवा क्रांती वृत्तसेवा)
पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लिंक वर क्लिक करा👇🏻









